बातमीदार गणेश रांगणकर
वणी:येथील विठ्ठलवाडी परिसरातील युवक व मित्र मंडळी वरोरा तालुक्यातील भटाळा गावी महाशिवरात्री निमित्य भरणाऱ्या यात्रेचा आनंद घेण्याकरिता गेले होते. महाशिवरात्री यात्रेवरून परत येत असताना त्यांना पोहायचा मोह सुटला .वर्धा नदीत पोहायला उतरलेल्या तीन युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला . ही घटना वणी तालुक्यातील पाटाळा पुलावर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.पोहायला गेलेल्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले.निरुद्ध चाफले (22), हर्ष चाफले (16) आणि संकेत नागराळे (27) सर्व. विठ्ठलवाडी वणी अशी नावे आहेत तीन युवक नदीत बुडाल्याची माहिती पसरताच माजरी वं वणी येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले . पोलिसांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन शोधण्याचे कार्य सुरु केले मात्र , रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही.शनिवारी शोधकार्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली .पोहायच्या मोहात अनर्थ घडला.वणीतील तीन युवकाचा बुडून मृत्यु
March 08, 2024
0
Tags